हिवाळ्यात त्वचा कोरडी होणे, ही एक सामान्य समस्या आहे. कारण सतत लागत असलेल्या वाऱ्यामुळे त्वचेचा ओलावा कमी होतो. विशेषतः थंड आणि कोरड्या वाऱ्यामुळे ओठ फुटण्याची समस्या अधिक होते. कारण ओठांची त्वचा खूप पातळ असते. याशिवाय, ओठांच्या त्वचेला तेल ग्रंथी म्हणजेच नैसर्गिकरित्या तेल निर्माण करणाऱ्या तेल ग्रंथी नसतात. यामुळे, ओठांची त्वचा नैसर्गिकरित्या मॉइश्चरायझ होत नाही. कोरड्या वाऱ्यामुळे ओठांना सर्वाधिक त्रास होतो. योग्य हायड्रेशन, वेळोवेळी मॉइश्चरायझिंग आणि छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवून ओठ फाटण्याची समस्या टाळता येते.
Also Read: हिवाळ्यात बेस्ट विंटर लुकसाठी स्टाईल करा 'या' उबदार शॉल, मिळवा परफेक्ट लुक
ड्राय स्किन
कोरडी त्वचा असलेल्यांसाठी हिवाळा अधिक चॅलेंजिंग असतो. हिवाळ्यात ड्राय स्किन असलेल्यांची त्वचा लवकर ओलावा गमावते, ज्यामुळे ओठ फाटण्याची समस्या होते . या व्यक्तींची त्वचा संवेदनशील श्रेणीत येते. जर तुमची त्वचा कोरडी असेल तर तुम्ही हिवाळ्यात अतिरिक्त काळजी घेतली पाहिजे. यासाठी तुम्ही दीप मॉइश्चरायझिंगची सवय लावा.
थंडीत राहणे.
काही लोक दिवसभरातून अधिक वेळ थंड हवेत घालवतात. आम्ही तुम्हाला सांगतो की, जोरदार वाऱ्याच्या संपर्कात येतात त्यांना ओठ फाटण्याची शक्यता जास्त असते. उदाहरणार्थ, बरेच लोक हिवाळ्यात फिटनेससाठी सायकलिंग करतात, ज्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर जोरदार वारा येतो. त्यामुळे या परिस्थितीत ओठ कोरडे होण्याची समस्या विशेषतः त्रासदायक ठरते.
सन एक्सपोजर
सन एक्सपोजरमुळे देखील ओठ फाटण्याचा त्रास होतो, ज्यामुळे ओठांवर रंगद्रव्य येऊ शकते. या रंगद्रव्यामुळे ओठ काळे होऊ शकतात. म्हणून, सन प्रोटेक्शन लिप बाम केवळ चेहऱ्यावरच नाही तर ओठांना देखील लावणे, आवश्यक आहे. एवढेच नाही तर, हात आणि पायांनाही सन प्रोटेक्शन लोशन लावावे.
न्यूट्रिएंट्स आणि पाण्याची कमतरता
ज्या लोकनामध्ये न्यूट्रिएंट्स आणि पाण्याची कमतरता असते, त्यांना ओठ फाटण्याची शक्यता जास्त असते. चहा किंवा कॉफी वारंवार पिल्याने डिहायड्रेशन देखील होऊ शकतो. यासह त्वचा कोरडी होण्याची सासम्य होते. तुमच्या आहारात व्हिटॅमिन C, प्रथिने आणि फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा. भरपूर द्रवपदार्थ, भरपूर पाणी असलेले पदार्थ आणि भरपूर पाणी प्या.
वाईट सवय
काही लोकांना वारंवार ओठ चाटण्याची किंवा चावण्याची सवय असते. अशा लोकांचे ओठ सहज फुटतात आणि त्यावर डेड स्किनची लेयर तयार होतो. जर तुम्हाला देखील ही वाईट सवय असेल तर तुम्ही ती लगेच सोडली पाहिजे. एवढेच नाही तर, गरम पाण्याने वारंवार आंघोळ केल्याने त्वचा कोरडी होते.
image credit: pexels